दलितांवरील अत्याचाराच्या घटना तात्काळ थांबवाव्यात : रामदास आठवले

17

जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या शिवनी जामगा येथे क्षुल्लक कारणावरुन बौद्ध समाजावर हल्ला करण्यात आला होता.मंगळवारी रामदास आठवले यांनी या गावाला भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. 

यावेळी त्यांच्यासमवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यउपाध्यक्ष विजय सोनवणे, जिल्हाध्यक्ष गौतम काळे, मिलिंद शिराढोणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारने त्या तात्काळ थांबवाव्यात असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता. दोन) नांदेड जिल्ह्यातील शिवनी जामगा येथे केले आहे.

गणेश येडके या तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याला गंभीर जखमी केले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणावरुन पडसाद उमटले असून अनेक आंबेडकरी नेत्यांनी या गावाला भेटी दिल्या. त्या घटनेचा निषेध करत ता. 23 रोजी लोहा शहर बंद पुकारण्यात आले होते.